नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्किल इंडिया मिशन अंतर्गत भारतातील तरुणांना करिअरच्या संधींना चालना देण्यासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय 12 डिसेंबर रोजी 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 197 ठिकाणी ऍपरेन्टिस मेळावे आयोजित करीत आहे.
या मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या मेळ्यात अनेक स्थानिक व्यवसायिकांना आमंत्रित करण्यात आले आहे जेणेकरून स्थानिक तरुणांना शिकाऊ प्रशिक्षणाद्वारे त्यांचे करिअर घडवण्याची संधी मिळेल. तसेच या उपक्रमात विविध कंपन्यांचाहीं सहभाग असेल.
सहभागी कंपन्यांना एकाच व्यासपीठावर संभाव्य प्रशिक्षणार्थींना भेटण्याची आणि जागेवरच अर्जदारांची निवड करण्याची आणि त्यांना रोजगार देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. इच्छुकांनी त्यासाठी जारी करण्यात आलेल्या वेबसाईटवर आपली नाव नोंदणी करावी.
ज्या उमेदवारांनी इयत्ता 5 वी ते इयत्ता 12 वी उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांच्याकडे कौशल्य प्रशिक्षण प्रमाणपत्र आहे, किंवा जे आयटीआय किंवा डिप्लोमा धारक, पदवीधर आहेत त्यांना यात भाग घेता येईल. ज्यांनी आधीच नावनोंदणी केली आहे त्यांनी सर्व संबंधित कागदपत्रांसह कार्यक्रमस्थळी पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.