Anurag Thakur : पाच राज्यांच्या नुकत्याच झालेल्या निकालानंतर द्रमुकचे खासदार सेंथिल कुमार यांनी हिंदी पट्ट्यातील राज्यांबाबत वादग्रस्त विधान करून त्यांची तुलना ‘गोमूत्र’शी केली. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातील तापमानचांगलेच तापले आहे. सेंथिल यांच्या वक्तव्याचा भाजपने समाचार घेत त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सेंथिल कुमार यांच्या वक्तव्याचा समाचार घेत,”विरोधकांनी शिवीगाळ केली आहे. भारताची संस्कृती, आणि अस्मिता नष्ट करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष भारत आणि भारतीयांचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाहीत.” असे त्यांनी यावेळी म्हटले.
काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींवर हल्लाबोल करताना माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणाले, “त्यांच्या विधानावर राहुल गांधी आणि पक्ष का शांत आहे? अशा विधानांवर मौन का आहे? ईव्हीएमशिवाय ते भारताची संस्कृती नष्ट करण्याचा कट रचत आहेत. अमेठीच्या पराभवानंतर. राहुल गांधींनी वायनाडमध्ये उत्तर भारतीयांचा अपमान केला होता, त्यांची विचारसरणी फक्त हिंदू, हिंदी आणि सनातनींना अपमानित करण्याची असल्याचे म्हणत त्यांनी टीका केली.
ते पुढे म्हणाले, “पराभवानंतरही काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांचा अहंकार कमी झालेला नाही. राहुल गांधी, मला सांगा की तुमची भारत जोडो यात्रा एकजूट करण्यासाठी होती की तोडण्यासाठी? असा सवालदेखील त्यांनी यावेळी केला. तसेच ” तेलंगणाचा डीएनए बिहारच्या डीएनएपेक्षा चांगला आहे. तुम्ही कधी जातीवाद पसरवता, तर कधी प्रादेशिकता पसरवता.असेदेखील त्यांनी यावेळी म्हटले.