बॉलीवूडमधील सुपरस्टार सलमान खान याच्या आगामी चित्रपटाची चाहते अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत आहेत. सलमान खानचा चित्रपटगृहात “अंतिम” हा अखेरचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटालाही प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. आता भाईजानने आणखी एक चित्रपटाची घोषणा केली आहे.
सलमानने बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या “बजरंगी भाईजान’ चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा केली आहे. त्याने ही घोषणा “आरआरआर’च्या प्री-रिलीज इव्हेंटच्या वेळी केली. या चित्रपटाची कथा राजामौलीचे वडील केवी विजयेंद्र प्रसाद हे लिहिणार आहे.
“बजरंगी भाईजान’चे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले होते. या चित्रपटाची कथाही विजयेंद्र
प्रसाद यांनी लिहिली होती. यात सलमानसह करिना कपूर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट 2015मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.