शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली शालेय शिक्षण मंत्र्यांची भेट
नगर: राज्यातील रात्रशाळा कर्मचाऱ्यांना पूर्ण वेळ करावे, सन 2005 पूर्वीचे व नंतरच्या कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह शिक्षकांच्या इतर प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
चर्चेतील विषयानुसार शालेय शिक्षण मंत्री पुढील आठवड्यात संघटनेच्या पदाधिकार्यांसह बैठक घेऊन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार, राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू, सरकार्यवाह नरेंद्र वातकर, राज्य संयोजक (रात्र शाळा) निरंजन गिरी, अनिल सोले, संजय येवतकर (पेन्शन बचाव समिती), भगवानराव साळुंखे, संतोष धावडे, शिवनाथ दराडे, उल्हास वडोदकर आदी उपस्थित होते.
ग्रंथपालाच्या विनाअट मागण्या मंजूर कराव्या, खाजगी अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील प्रस्ताव (वाढीव) पदावरील शिक्षकांच्या पदांना मंजुरी संदर्भात तातडीने उच्चस्तरीय समितीची बैठक घेण्यासंदर्भात तसेच शिक्षकांच्या प्रलंबीत प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी शिक्षक परिषदेचे नाशिक विभागाध्यक्ष प्रा. सुनील पंडित, बाबासाहेब बोडखे, शरद दळवी, शशिकांत थोरात, विनायक कचरे, तुकाराम चिक्षे, चंदकांत चौगुले, सखाराम गारूडकर, अशोक झिने, प्रा. सुीनल सुसरे, सुभाष ढेपे, विठ्ठल ढगे, अनिता सरोदे, सुलभा कुलकर्णी, बबन शिंदे, प्रा. श्रीकृष्ण पवार, प्रा. बाबासाहेब शिंदे, सर्जेराव चव्हाण, निलेश बांगर, नितीन म्हस्के, देवकर, उकीर्डे, अरविंद आचारी, अनिल आचार्य, शिवाजी धाडगे, सुरेश विधाते, अविनाश आपटे आदी प्रयत्नशील आहेत.