मुंबई – कंगना नेहमीच ट्विटवर ट्विट करत असते तिच्या ट्विटमुळे नेहमीच सोशलवर वाद निर्माण होतात. एका पाठोपाठ एक वादाला तोंड फोडणारे ट्विट तिच्याकरून आतापर्यंत करण्यात आले आहे. कंगणाने मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मिर सोबत केली होती. त्यानंतर ट्विटरवर #आमचीमुंबई नावाचा हॅशटॅग ट्रेंड झाला. अनेक मुंबईकरांनी किंवा राजकारण्यांनी यावर टीका केली. या एका ट्विटमुळे वादाला तोंड फुटलं. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरसुद्धा तिने अनेकांना दोषी ठरवलं होतं. यावेळी तिला भाजपने संपूर्ण पाठिंबा दिला. केंद्रसरकार कडूून अभिनेत्री कंगणा राणावतला वाय सिक्यूरीटी देण्यात आली आहे.
Every fool that is trying to milk tragedy that took place in HP with regards to one of the politicians death today. Must read this and see my level before doing small talks about me.Remember when you talk about Babbar Sherni Rajputana Kangana Ranaut. No small talks only big talks https://t.co/gvFP8EYNuk
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 17, 2021
कंगणा ही पहिली बाॅलीवूड अभिनेत्री आहे. कंगणा आणि शिवसेनेत सध्या बाचाबाची सुरु आहे. अनेकांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. यादरम्यान सोशलवर ती लवकरच राजकारण एन्ट्री करणार अशी चर्चा होती. या सर्व चर्चनांवर तिने नुकतेच मौन सोडले आहे.
कंगनाला एका युजर्सने पुन्हा एकदा राजकारणात एन्ट्री करणार असल्याचे ट्विट करत टॅग केले आहे की,’ कंगणा राणावत येत्या काळात मंडी लोकसभा मतदार संघातली पोटनिवडणुकीची तयारी करणार..’ यावर तिने उत्तर दिले आहे की, ‘2019 मध्ये मला ग्वाल्हेर लोकसभा निवडणूक लढवण्याचा पर्याय देण्यात आला होता. हिमाचल प्रदेशची लोकसंख्या 70 ते 80 लाख आहे. येथे फार गरीबी आणि गुन्हेगारी नाही. होय, मी राजकारणात आलेच तर, अशा राज्यातून निवडणूक लढेल जिथे जास्त आव्हाने असतील,’ असं कंगणा म्हणाली.