खचून जाऊ नका : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
पिंगोरी येथील नुकसानीची केली पहाणी
नीरा – पुरंदर तालुक्यातील पिंगोरी आणि कांबळवाडी या परिसरात झालेल्या अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांच्या डोळ्यात आलेले पाणी पाहून आमदार संजय जगताप ही भावूक झाले. खचून जाऊ नका शासनाच्यावतीने मदत केली जाईल, असे आश्वासन आमदार संजय जगताप यांनी दिले.
पिंगोरी आणि कांबळवाडी (ता. पुरंदर) या गावांमध्ये दोन दिवस सलग या भागात 100 मीलीमिटर पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे येथील शेती बंधारे आणि जागोजागी रस्तेही वाहुन गेले आहेत.
धवारी (दि. 9) मोठा पाऊस झाल्याने आमदार संजय जगताप यांनी गुरुवारी (दि. 10) सकाळी 8 वाजता पिंगोरी येथे धाव घेतली. प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पाणी केली. यावेळी पिंगोरीचे पोलीस पाटील राहुल शिंदे,माजी सरपंच विद्या यादव, वसंत शिंदे, दत्ताराजे शिंदे, राजकुमार शिंदे, निलेश शिंदे यांसह तालुका कृषी अधिकारी अंकुश बर्डे, अनिल दुर्गाडे, एस. पी. गायकवाड, पी. डी. भंडलकर, एक. एस. चव्हाण, ए. एस. शिंदे, संभाजी गरुड, मंडल अधिकारी लाखे, तलाठी खोमणे आदींसह अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार जगताप यांनी यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या महसूल कृषी व ग्रामविकास विभाच्या अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसामुळे पिंगोरी गावाला जाणारे रस्ते खराब झाले आहेत.विजेचे खांब पडले आहेत. शेताचे बांध बंधारे वाहून गेले असून आमदार जगताप यांनी चालत जाऊन या नुकसानीची पाहणी केली. व रस्ते व वीजपुरवठा तातडीने पुर्ववत करण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत.