कोल्हापूर – आजच्या घडीला सार काही शक्य आहे, आपण एकविसाव्या शतकात जगतोय, असे म्हणतो. पण हे कितपत खरे आहे. खरंच सुधारणा झाली आहे का ? कारण ही घटना आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील पेरणोली धनगरवाड्यावरची. येथील एका महिलेला प्रसुतीसाठी दवाखान्यात नेण्यासाठी चक्क झोळी कारवी लागली. आड वळणाची वाट, जंगल, खाच खळगे चुकवत तिला नेण्यात आले. हा सर्व प्रकार पाहता सरकारनं शरमेने मान खाली घालावी अशी घटना घडली. प्रसुतीसाठी महिलेला झोळीतून नेण्याची वेळ आली. दरम्यान, वाटेतच ओढ्याकाठी ती प्रसुत झाली
त्यानंतर तान्हुलीसह तरीही तिचा प्रवास सुरुच राहिला. जिथे रस्ता तयार आहे तिथे अॅमेबेयुलन्स येऊन थांबलेली. तिथून पुढे बाळ बाळंतीण उपचारासाठी निघाल्या. पण ही आजची घटना नाही. या भागात ना लाईट ना रस्ते, मग आरोग्य सुविधांचा तर विचारही करू शकत नाही. त्यामुळे 108 नंबरची अॅम्ब्युलन्सही येत नाही.
आता आणि याआधीही आजारी माणसाला, गर्भवती महिलेला असेच झोळीतून न्यावे लागते. लाईटसाठी खांब लागले पण वनविभागाचे धोरण आडवे आले आहे. घनदाट जंगलातून जाताना जंगली प्राण्यांचीही भीती येथील नागरिकांच्या पाचवीलाच आहे.