अमरावती – अमरावती जिल्हयातील रहाटगाव रिंगरोडवर ट्रक व कारचा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू, तर पाच जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात ओव्हरटेकच्या नादात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
वाहन चालक व मालक रोशन आखरे, प्रतिभा पोकळे, कृष्णा घाडगे आणि गजानन दारोकर अशी चार मृतांची नावं आहे. अन्य एका मृताचे नाव समजून शकले नाही. हे सर्व जण अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी येथील रहिवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त ट्रक अमरावतीवरून नागपूरच्या दिशेकडे जात होता तर अमरावतीवरून वलगावकडे कार जात होती. कारमधील सर्व प्रवासी हे वलगाव येथे साक्षगंध सोहळ्याला जात होते.
अमरावती शहरातील रहाटगाव रिंगरोडवर कार पोहोचली असता ट्रकला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होता की, या अपघातात कारचा चक्काचूर झाला. यातील चार जणांचा जागीच, तर एकाचा रुग्णालयात दाखल करण्यापासूनच मृत्यू झाला. या अपघातात अन्य 5 जण जखमी झाले आहे. या जखमींवर अमरावतीच्या खासगी रुग्णालयात उपचार असून रुग्णालयात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जाऊन नातेवाईकांची भेट घेऊन विचारपूस केली.