लखनौ – करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशात जी क्वारंटाईन केंद्रे उभारण्यात आली आहेत, त्याच्या देखरेखेसाठी एनसीसी कॅडेट्सचा उपयोग करून घेण्याची सूचना त्या राज्याचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी केली आहे.
आज राज्यातील एका आढावा बैठकीत बोलताना त्यांनी ही सुचना केली. ते म्हणाले की विविध राज्यांमधून स्थलांतरीत मजुरांना उत्तरप्रदेशात आणले जाईल. त्यांना येथे आणल्यानंतर त्यांची क्वारंटाईन केंद्रांमध्ये रवानगी केली जाणार आहे.
अशा केंद्रांच्या देखरेखेसाठी एनसीसी छात्रांचा उपयोग करून घेतो येणे शक्य आहे. 3 मे नंतर उत्तरप्रदेशात औद्योगिक प्रकल्प सुरू केले जाणार आहेत त्याचा आराखडा तयार करण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. राज्यात आणिबाणीच्या वैद्यकीय सेवेची सज्जता ठेवण्याचा आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.