मुंबई – अभिनेता अक्षय कुमारचा ‘OMG 2’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर आता अक्षय ‘वेलकम 3’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मात्र आता ‘वेलकम 3’ या चित्रपटाचे शूटिंग थांबवले आहे. त्यामागचे कारण देखील आता समोर आले आहे.
फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (FWICE) फिरोज नाडियादवाला यांच्यावर पैसे न दिल्याचा आरोप केला आहे. तसेच शूटिंग थांबवण्यासाठी कलाकारांना पाठिंबा देण्याची विनंतीही केली आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे अध्यक्ष बीएन तिवारी म्हणाले की, “आम्ही अक्षय कुमार आणि दिशा पटानी यांच्यासह चित्रपटातील इतर सर्व कलाकारांना कळवले आहे की फेडरेशनने इन-कॉर्पोरेशन जारी केले आहे. फिरोज नाडियादवाला यांच्यावर पेमेंट न केल्याचा आरोप करण्यात आला असून, टेक्निशियनची 2 कोटी रुपयांची देणी देईपर्यंत त्यांनी चित्रपटाचे शूटिंग करू नये,” असे म्हटले आहे.
यासोबत ते म्हणाले की, “फिरोज नाडियादवाला यांनी 2015 मध्ये वेलकम 2 च्या तंत्रज्ञांना पैसे दिले होते आणि ही रक्कम सुमारे 4 कोटी रुपये होती, त्यानंतर ती आता 2 कोटी रुपये झाली आहे. मात्र, चेक जमा केल्यानंतर नाडियादवाला यांनी त्याचे पेमेंट थांबवले आहे. फिरोज नाडियाडवाला जोपर्यंत त्यांची थकबाकी भरत नाहीत तोपर्यंत ते शूट करू देणार नाहीत.” असा निर्णय घेण्यात आला आहे.
“यासोबतच 2015 मध्ये इन-कॉर्पोरेशन जारी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रकरणाला 8 वर्षे झाली असून अद्यापही त्यांनी पैसे दिलेले नाही. पण ते आता अंमलात आणणार आहे, कारण शेवटी त्याने त्याच्या पुढच्या चित्रपटावर काम सुरू केले आहे. पेमेंट पूर्ण होईपर्यंत त्याला शूट करू नका,” अशी विनंती आम्ही केली आहे.
दरम्यान, वेलकम’च्या तिसऱ्या भागाला आधी ‘वेलकम टू द जंगल’ असे म्हटले जात होते, पण आता या चित्रपटाचे नाव ‘वेलकम 3’ असणार आहे. अक्षय कुमारसोबत या चित्रपटात संजय दत्त, अर्शद वारसी, रवीना टंडन, दिशा पटानी, जॅकलीन फर्नांडिस, लारा दत्ता यांसारखे कलाकार आहेत. मात्र आता या सर्व प्रकरणामुळे ‘वेलकम 3’ च्या शुटींगला ब्रेक लागला आहे.