मुंबई – नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी विरोधात सध्या देशातील प्रत्येक शहरात निदर्शने केली जात आहेत. काही ठिकाणी शांततेत, तर काही ठिकाणी हिंसक आंदोलन झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर अक्षय कुमारने देशातील जनतेला हिंसा न करण्याची विनंती केली आहे.
दरम्यान, एका खासगी कार्यक्रमावेळी अक्षय कुमाने नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी विरोधातील हिंसक आंदोलनाच्या विरोधात सर्व देशातील जनतेला आग्रहाची विनंती करत म्हटले की,’मला हिंसा आवडत नाही मग ते डाव्या विचारसरणीचे असो व दक्षिणेतील असो, हिंसक आंदोलनमुळे नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट होते म्हणून नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट होते नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट करू नका, तुमचे मत सकारात्मकतेने मांडा, या मुद्यावर चर्चा मार्ग काढा.’ असं म्हणत अक्षय कुमारने हिंसाचार करू नका असे आवाहन केले आहे.