नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सर्व पक्ष जोरदारपणे करतांना दिसत आहेत. त्यातच समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी नुकतेच सभा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे, यावेळी त्यांनी
नरेंद्र मोदी यांनी समाजवादी पक्षाच्या लाल टोपीचा उल्लेख धोकायदाक असा केला. या लाल टोपीचा संबंध लाल दिव्याच्या वाहनाशी जोडत या पक्षाचे नेते सत्तेसाठी हपापलेले आहेत, असा हल्लाबोल पंतप्रधानांनी केला.
भाजपा के लिए ‘रेड एलर्ट’ है महंगाई का; बेरोज़गारी-बेकारी का; किसान-मज़दूर की बदहाली का; हाथरस, लखीमपुर, महिला व युवा उत्पीड़न का; बर्बाद शिक्षा, व्यापार व स्वास्थ्य का और ‘लाल टोपी’ का क्योंकि वो ही इस बार भाजपा को सत्ता से बाहर करेगी।
लाल का इंक़लाब होगा
बाइस में बदलाव होगा! pic.twitter.com/NPDAGzzjIi— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) December 7, 2021
अखिलेश यादव यांनी मोदींच्या टीकेला उत्तर दिले असून म्हटले आहे की, “भाजपासाठी रेड अलर्ट आहे महागाईचा, बेरोजगारीचा, शेतकरी-मजुरांच्या परिस्थितीचा, हाथरस, लखीमूपर, महिला आणि तरुणांच्या छळाचा, व्यापार आणि आरोग्य सेवांचा आणि ‘लाल टोपी’चा कारण तेच भाजपाला सत्तेबाहेर करणार आहेत”. यावेळी त्यांना २०२२ मध्ये बदल होईल असेही म्हटले आहे.
अखिलेश यादव यांनी सभेत बोलताना भाजपाचे सर्व काही खोटं असल्याचा टोला लगावला. ते म्हणाले की, “भाजपाची प्रत्येक गोष्ट खोटी आहे. त्यांची सर्व आश्वासनं खोटी आहेत. ते एक खोटं फूल असून सुगंधदेखील देऊ शकत नाहीत,” असे अखिलेश यादव म्हणाले.
तसेच सभेत बोलताना त्यांनी गर्दीकडे हात दाखत यावेळचा उत्साह पाहून २०२२ मध्ये बदल होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. तसंच यावेळी पश्चिमेला (उत्तर प्रदेश) भाजपा सूर्योदय होणार नाही. येथील शेतकरी आणि तरुणांनी भाजपाला पळवून लावण्याचा निर्णय घेतला आहे असेही म्हटले.