मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा भेटीवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सडकून टीका केली आहे. संजय राऊत हे हे एक नंबरचे डबल ढोलकी आहे असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी सडकून टीका केली आहे.
ते माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’ममता बनर्जी मुंबईमध्ये आल्या की त्यांच्या सुरात सुर मिसळतात. दिल्लीत गेले की राहुल गांधी यांच्या सुरात सुर मिसळतात. संजय राऊत हे एक नंबरची डबल ढोलकी आहेत. अशी टीका पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, राज्यसभेतील शिवसेनेचे नेते संजय राउत यांनी आज कॉग्रेस नेते राहुल गांधी यांची निवासस्थानी भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना राउत म्हणाले की, ‘विरोधी पक्षांची देशव्यापी महाआघाडी बनविण्यासाठी राहुल गांधी यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे’. राहुल गांधी आणि संजय राउत यांची ही भेट ममता बॅनर्जी यांच्या स्वप्नावर विरजण सोडण्यासारखे आहे, अशी चर्चा रंगली आहे.
राहुल गांधी यांच्यासोबतची भेट एक नियमित भेट होती. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी अशाप्रकारच्या भेटी घेतल्या जात असतात, असे सेनेने म्हटले आहे.