सोलापूर – दहीहंडी उत्सव कोरोनाच्या कारणामुळे करू नका अशी सरकारची भूमिका आहे. मात्र आपण स्वतः मुख्यमंत्र्यांना पहिल्यांदा दहीहंडीच्या विनवणीसाठीच फोन केला. दोन डोस झालेल्या आणि प्रमाणपत्र असलेल्या, जास्त उंच नसलेला असा पारंपरिक पद्धतीने दहीहंडी उत्सव आम्हाला करू द्या. पारंपारिक कमी गर्दीच्या, कमी उंचीच्या दहीहंडीला परवानगी दिली पाहिजे. जर नाही दिली तर सरकारच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचंही यावेळी आशिष शेलार म्हणाले.
भाजपचे माजी मंत्री आमदार आशिष शेलार दोन दिवसीय सोलापूर दौऱ्यावर आहेत. या दोन दिवसांत भाजपच्या विविध कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन संघटनात्मक विषयांवर त्यांच्या बैठका आहेत. आज सोलापुरात त्यांचं आगमन झाले.
महाविकास आघाडीचा काळामध्ये लोकांचे जीव असुरक्षित असूनसुरक्षा फक्त नेत्यांच्या मुलांची वाढली आहे, महिलावर, बालकांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत.पोलिसांवरचा सरकारचा वचक निघून गेला आहे. पोलिसांच्या आपापसातील गटबाजीमुळे ते आतून पोखरून गेले आहेत, सामान्य माणसांचा जीव असुरक्षित झाला आहे, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सरकारने गांभीर्याने घेण्याची हात जोडून विनंती असे ते यावेळी म्हणाले.