Raj Thackeray : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी जून महिन्यात शिवसेनेत ( Shiv sena ) मोठा बंड पुकारला. त्यामुळे अडीच वर्षांपासून राज्यात कारभार पाहत असलेले महाविकास आघाडी सरकार अवघ्या दोनच दिवसात कोसळले होते. एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी या बंडात शिवसेनेचे तब्बल ४० आमदार आपल्या बाजूने वळवले. यापुढेही जाऊन त्यांनी पक्षाच्या १२ खासदारांना देखील शिवसेनेतून ( Shiv sena ) आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले.
अगोदर आमदार आणि नंतर खासदारांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ( Udhdav Thackeray ) यांना रामराम ठोकल्याने राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. तसेच पक्षातील अनेक पदाधिकारी देखील एकनाथ शिंदे यांच्या वाटेवर गेल्याचे पाहायला मिळाले. यानंतर मात्र उद्धव ठाकरे ( Udhdav Thackeray ) यांनी आपल्या उरलेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याकडून निष्ठेचे शपथपत्र घेतल्याचे समोर आले होते. यानंतर आता शिवसेनेच्याच पावलावर पाऊल टाकत मनसे ( MNS ) देखील आपल्या मनसैनिकांकडून निष्ठेची शपथपत्रे घेणार असल्याचे समजत आहे.
एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार व खासदार आपणच खरी शिवसेना आहोत असे ठोकपणे सांगत आहेत. मात्र खरी शिवसेना कोणाची याबाबत कोणताही निर्णय समोर आलेला नाही. या निर्णयाबाबतची प्रक्रिया न्यायपालिकेत सुरु आहे. तर दुसरीकडे शिंदे आणि ठाकरे हे दोन्ही गट समाजात आपापली प्रतिमा स्थापित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पक्ष मजबूत राहावा म्हणून त्यांच्या बाजूने असलेल्या कार्यकर्त्यांकडून निष्ठेची शपथपत्रे घेतली होती. आगामी काळातील निवडणूका असतील किंवा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न, याच गोष्टींना समोर ठेऊन राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी उद्धव ठाकरे यांचा हा फंडा वापरलाचे म्हटले जात आहे.
राज्यात सर्वप्रथम चंद्रपूर जिल्ह्यातील मनसैनिकांनी राज ठाकरे यांना निष्ठेची शपथपत्रे भरून दिल्याचे समोर आले आहे. राज ठाकरे ( Raj Thackeray ) हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे शपथपत्रे भरवून घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) पदाधिकाऱ्यांना तशा सूचना देखील दिल्याचे समोर आले होते. त्यामुळे आता राज यांच्याच आदेशावरून कार्यकर्त्यांकडून ही शपथपत्रे भरून घेतली जात असल्याचे म्हटले जात आहे. कारण शिवसेनेत बंड झाल्यापासून जो तो आपल्या पक्षात फूट पडू नये याची काळजी घेत आहे.