मुंबई – अटलबिहारी वाजपेयी यांची आज जंयती देशभर साजरी होत असून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांकडून अटलबिहारी वाजपेयींना आदरांजली वाहण्यात येत आहे.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही अटलबिहारी वाजपेयींना आदरांजली वाहिली आहे. अटलबिहारी यांच्या आठवणी जागवताना पंडित नेहरुंनंतर अटलबिहारी वाजपेयी हेच देशातील सर्वात लोकप्रिय नेते होते, असे संजय राऊत यांनी म्हटलं.
संजय राऊत म्हणाले,’हिंदुत्वाच्या विचारधारेशी कधीही तडजोड न करता देशातील एकात्मता टिकली पाहिजे यासाठीच त्यांनी राजकारण केलं. धर्मांधता, जातंधता या दोन शब्दांना दूर ठेवूनही हिंदुत्वाचं राजकारण करता येतं, हे त्यांनी देशाला व जगाला दाखवून दिलं.’
ते पुढे म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचं अतिशय जवळचं नातं होतं. देशाचे प्रतप्रधान म्हणून ते बाळासाहेब ठाकरे यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा करत होते, त्यांच्याशी सल्लामसलत करत होते. शिवसेना आणि भाजपा यांच्या युतीत अटलबिहारी वाजयेपी यांचं मोठं योगदान होतं”