परभणी – जुन्या खासदारांकरता आम्हीच मत मागायचो, पण दुर्देवाने सांगावे वाटते की ते निवडून आल्यानंतर तुम्हाला, दिल्लीला, लोकसभेला आणि विकासाला विसरत होते.
त्यांचा फंडा पक्का होता तो म्हणजे निवडणूक आली की उभं राहायचं लोकांची मत मागायची आणि त्यानंतर विकासाल विसरून जायचे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीचे शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय हरिभाऊ जाधव यांच्यावर निशाणा साधला.
फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षात देश बदलला. गरिबाबद्दल प्रत्येक व्यक्ती बोलायचा. पण पहिल्यांदाच या देशात गरीब कल्याणाचा अजेंडा या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवला. 10 वर्षांत 25 कोटी लोकांना गरिब रेषेच्याबाहेर काढले.
सातत्याने गरिबांचा विचार केला आणि प्रयत्न करत परिवर्तन केले. पण 10 वर्षात तुम्ही जे परिवर्तन पाहिले. तो फक्त ट्रेलर होता पिक्चर अजून बाकी आहे. पुढील पाच वर्षात भारत आणि महाराष्ट्र ज्या पद्धतीने बदल होणार आहे याचा विचार आपण करू शकत नाही, असे फडणवीस म्हणाले.