मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमरदारांसह बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटातून गळती सुरुच झाली. त्यानंतर आता ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे या आता शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर आदित्य ठाकरेंचा निलम गोऱ्हेंनवर प्रहार केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे की,’स्वार्थी विरुद्ध प्रामाणिक विचारसरणी अशी ही लढाई आहे! एकाच व्यक्तीला ४ वेळा विधान परिषदेवर जाण्याची संधी उद्धवसाहेबांनी दिल्यावरही, २१ वर्ष तिथे असूनही, २ वेळा संविधानिक पदांचा लाभ मिळूनही…’ असं म्हणत त्यांनी एक कविताही शेअर केली आहे.
आदित्य ठाकरे यांचे ट्विट
स्वार्थी विरुद्ध प्रामाणिक विचारसरणी अशी ही लढाई आहे!
एकाच व्यक्तीला ४ वेळा विधान परिषदेवर जाण्याची संधी उद्धवसाहेबांनी दिल्यावरही, २१ वर्ष तिथे असूनही, २ वेळा संविधानिक पदांचा लाभ मिळूनही…
एकच गाणं आठवतं, यह मोह मोह के धागे…
खुर्चीचा मोह,
नाती तोडतो,
नैतिकता विसरवतो!— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 7, 2023