नीरा नरसिंहपूर-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावे यासाठी तरुणाईचे नरसिंहाला पदयात्रा काढून लक्ष्मी नरसिंहाला साकडे घालण्यात आले.
संगम गाव ते नीरा-नरसिंहपूर येथे गणेश इंगळे, युवा सेना माळशिरस तालुकाप्रमुख सोनु पराडे पाटील, युवा सेना सोलापूर उपजिल्हा प्रमुख शेखर खिलारे, अकलुज शहर प्रमुख महादेव बंडगर, पिंटु चव्हाण, सागर इंगळे, कल्याण इंगळे, डॉ. साळुंखे, अमर भोसले आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावे यासाठी पायी यात्रा काढत नरसिंहाच्या चरणी प्रार्थना केली. गोरगरीब शेतकरी राजा यांना सुख आणि समाधान होऊन शेतकरी राजा सुखी राहू दे, अशीही प्रार्थना केली.