जालना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्तवाखालील मिंधे सरकार फार काळ टिकणार नाही. हे असंवैधानिक सरकार लवकरच कोसळणार आहे, असा हल्लाबोल माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. तसेच गद्दारांनी महाराष्ट्राचे पाच तुकडे करण्याची सुपारी घेतली असल्याचा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला. जालना येथील बदनापूर येथे आयोजित शिवसंवाद कार्यक्रमात युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच फटकारले.
आदित्य ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवाज महाराज यांच्यासह राज्यातील महान व्यक्तींचा राज्यपालांनी सातत्याने अपमान केला आहे. महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक शब्दही उच्चारला नाही. तसेच विरोधकांकडून त्यांच्या हकालपट्टीची मागणी होत आहे. जर त्यांच्यात हिंमत असेल तर राज्यपाल बदलून दाखवावा, असे आवाहन त्यांनी मिंदे सरकारला केले.
उद्धव साहेब आणि मी पाठीवर 40 वार घेऊन लढतोय. शिवसेना आज विरोधात आहे, या आधीही विरोधात होती, मात्र ती जनतेच्या प्रश्नांसाठी लढत आहे. शिवसेनेचा जन्मच समाजसेवेसाठी आहे आणि आम्ही सत्तेसाठी नाही तर सत्यमेवसाठी आहोत’, असे त्यांनी शिंदे गटाला ठणकावून सांगितले.
शिवसेना आणि ठाकरे संपवयाची सुपारी मुख्यमंत्री व गद्दारांनी घेतली, हे त्यांनी जाहीर करावे. मी वरळीतून किंवा ठाणे मतदारसंघातून आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढण्याचे आव्हान केले, मात्र मुख्यमंत्री म्हणतात मी छोटे आव्हान घेत नाही तर अजून मोठे आव्हान येऊ दे. मुख्यमंत्रीजी इतका अहंकार पण बरा नव्हे. आम्ही छोटी माणसं असलो तरी जनतेसाठी जनतेच्या मध्ये राहून काम करतो’, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री यांना लगावला.
सभा होऊ नये म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रयत्न करतात. याचवेळी मीडियानेच प्रसारित बातमीत वरळी मतदारसंघात कोळी बांधवांसाठी आयोजित कार्यक्रमात इलाहाबादचे कोळीबांधव दिसतात. तर त्या सभेत रिकाम्या खुर्च्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.