Narayan Rane: ‘केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) लवकरच सुशांत सिंह आणि दिशा सालियन केसप्रकरणी जेलमध्ये जातील असा दावा नारायण राणेंनी केला आहे. त्यांच्यासोबत संजय राऊत (Sanjay Raut) देखील जेलमध्ये जातील असा दावाही नारायण राणे यांनी केला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, “आता हे ठाकरे गट बैठक घेतात. थोड्या दिवसांनी आदित्य ठाकरे हे बैठकीलासुद्धा नसतील. सुशांत सिंह राजपूत केसमध्ये आदित्य ठाकरे जेलमध्ये जातील. त्यांच्यासोबत संजय राऊत देखील असतील. यांच्याकडे असलेले 16 आमदारसुद्धा राहणार नाहीत. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात 16 चे 160 आमदार होतील, असा दावा केला होता. त्याबाबत देखील राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
’16 चे 160 करू, त्यासाठी जादूची कांडी आहे का?’ 16 पैकी निवडणुकीत 5 पण येणार नाहीत. पक्षातील जे आमदार होते, ते दिवसा ढवळ्या पळून गेले. काही दिवसांनी आदित्य ठाकरे, संजय राऊत जेलमध्ये सोबत असतील. यांना 160 जागा सुद्धा मिळणे कठीण आहे. ज्यांनी खोक्यांची डिलिव्हरी केली, त्यांच्यासमोर खोक्याचा विषय बोलू नये, मी त्यांना गांभीर्याने घेत नाही. यांची शिवसेना अधोगतीकडे येऊन पोहोचली आहे.
“आम्हाला सगळं माहिती आहे, कुठून खोकी यायची, कितव्या माळ्यावर जायची. एकनाथ शिंदे हे खोके पोहोचवणाऱ्यांपैकी आहेत, घरी नेणाऱ्यांपैकी नाहीत. राज्याच्या कारभारा संदर्भात उद्धव ठाकरे यांना शून्य माहिती आहे. विनायक राऊत आणि वैभव नाईक हे एकनाथ शिंदे केव्हा शिवसेनेत घेतायेत याची वाट पाहत आहेत,” असं नारायण राणे म्हणाले.
यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावरूनही त्यांच्यावर टीका केली. कोकणात पाहुणे येतात त्यानंतर कोंबडी वडे खाऊन जातात. त्यांनी आजपर्यंत कोकणाला काय दिलं? आदित्य ठाकरे शिवसैनिकांना का बघत नाहीत? अवस्था बिकट आहे. जे शिवसेनेत आहेत, ते पद वाचवायला आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नाहीत.”