Abhishek Singhvi High Court : हिमाचल प्रदेशमधून राज्यसभेची निवडणूक हरल्यानंतर काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी शनिवारी या निकालाला उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून आव्हान दिले आहे. या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ३४ मते मिळाल्याने भाजपचे उमेदवार हर्ष महाजन यांनी २७ फेब्रुवारीची निवडणूक चिठ्ठी सोडत काढून जिंकली होती. कायद्यात किंवा नियमांमध्ये चिठ्ठी सोडतीत ज्याचे नाव निघाले त्याला बाद ठरवण्याची कोणतीही तरतूद नाही पण आपल्या बाबतीत हा निर्णय घेतला गेला आहे असे सिंघवी यांचे म्हणणे आहे.
हिमाचल प्रदेशच्या विधानसभेत काँग्रेसकडे ४० सदस्यांचे संख्याबळ असताना आणि तीन अपक्षांचा पाठिंबा असतानाही, दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ३४ मते मिळाली कारण नऊ आमदार – सहा काँग्रेस बंडखोर आणि तीन अपक्ष – यांनी भाजपच्या हर्ष महाजन या उमेदवाराच्या बाजूने मतदान केले. | Abhishek Singhvi High Court
दोघांना समान मते मिळाल्याने चिठ्ठ्या सोडत काढण्यात आली. आणि त्यात सिंघवी यांच्या नावाची चिठ्ठी निघाली असताना त्यांना पराभूत घोषित करण्यात आले. ज्याचे नाव निघाले तोच पराभूत मानण्याची प्रथा आहे असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे म्हणणे होते. | Abhishek Singhvi High Court
त्यानुसार सिंघवी यांना पराभूत घेाषित करण्यात आले. सिंघवी म्हणाले की जगात कुठेही चिठ्ठीत ज्याचे नाव निघाले आहे त्याला बाद करण्याची प्रथा नाही. समसमान मते मिळाल्यानंतर चिठ्ठीत ज्याचे नाव निघते त्यालाच विजयी ठरवले पाहिजे पण येथे मला पराभूत ठरवण्यात आले असा आक्षेप सिंघवी यांनी घेतला आहे. | Abhishek Singhvi High Court