Will Eknath Khadse return to BJP : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे स्वगृही परतण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आयुष्यातील 40 वर्ष भाजपत गेलेल्या खडसेंची घरवापसी होणार आहे. चार वर्षांपूर्वी खडसे यांनी भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांवर आरोप करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
मात्र, आता लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये परतण्याच्या तयारीत आहेत. भाजपला उत्तर महाराष्ट्रात अपेक्षित बळ मिळत नसल्याने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने खडसेंना पुन्हा गळ टाकत स्वगृही परतण्यास सांगितल्याची चर्चा आहे.
एकनाथ खडसे यांनी तीन दिवसांपूर्वीच दिल्ली दौरा करून आल्यावर माध्यमांशी वक्तव्य करताना म्हटले होते की, भाजपमध्ये जायचे असेल तर वरिष्ठ पातळीवर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी माझे उत्तम संबंध राहिले आहेत. आताही त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे भाजपमध्ये जायचे असल्यास मला इतरांना विचारण्याची आवश्यकता नाही, असे सूचक वक्तव्य केले होते. | Will Eknath Khadse return to BJP
एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यामुळे ते भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर धरू लागली होती. अशातच एकनाथ खडसे यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्याचा फोटो समोर आला आहे. | Will Eknath Khadse return to BJP
केंद्रीय नेतृत्वाकडून खडसेंना संपर्क
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील भाजप नेतृत्व विशेषत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खडसेंच्या स्वगृही परतण्यासाठी तयार नव्हते, अशी चर्चा आहे. भाजपमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खडसे यांच्याशी संपर्क साधणारे केंद्रीय नेतृत्वच होते. राज्यात त्यांना महाजन, फडणवीस यांचा विरोध कायम आहे. दरम्यान, भाजपला लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात कठीण आव्हानाचा सामना करावा लागत असल्याने अखेर त्यांनीच खडसेंची संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे.
2 लोकसभा, 36 विधानसभेला फायदा?
एकनाथ खडसे यांचे भाजपमध्ये पुन्हा पुनरागमन झाले तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि रावेर यांसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघातील दिलासा मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या 6 जागा आणि एकूण 36 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत खडसेंचा फायदा होऊ शकतो, म्हणून दिल्लीतून त्यांना पुन्हा भाजपमध्ये येण्याचं साकडं घालण्यात आले आहे. | Will Eknath Khadse return to BJP
MIDC भूखंड प्रकरणामुळे अडचणीत
भाजप केंद्रात सत्तेत येण्यापूर्वी राज्यात खडसे हे भाजपकडून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी बाजी मारली. त्यानंतर फाडावीशी विरुद्ध खडसे असा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला. त्यातच खडसेंवर भोसरी एमआयडिसीतील भूखंड घोटाळ्याचे आरोप लागले यामध्ये त्यांच्या पत्नीचे देखील नाव समोर आले होते. यासह त्यांच्या जावयाला देखील एका प्रकरणात जेलवारी करावी लागली होती. या सर्व कारणांमुळे खडसेंनी फडणवीसांवर आरोप करत भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता ते पुन्हा भाजपमध्ये गेले तर त्यांना या सर्व आरोपांतून देखील दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
“रामाचे नाव घेऊन नथुरामाचा अजेंडा” काँग्रेस नेत्याचा भाजपवर हल्लाबोल