मुंबई – दिग्दर्शक संजय लीला भन्साळीचा ‘पद्मावत’ चित्रपट चांगलाच गाजला होता. मात्र, या चित्रपटाच्या नावावरून गदारोळ निर्माण झाला होता. ‘पद्मावत’ का ‘पद्मावती’ यावरून वाद निर्माण झाला होता. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग खिलजीच्या भूमिकेत दिसला असला तरी त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.
‘पद्मावत’ का ‘पद्मावती’ एवढेच नव्हे तर याशिवाय अनेक गोष्टींमुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. यात रणवीर सिंह ऐवजी शाहरुख खान या चित्रपटात दिसणार होता. त्यासाठी शाहरुखने एक ‘अट’ ठेवली होती. पण दीपिका पादुकोणने ही अट मान्य करण्यास नकार दिला. झाले असे की, दिग्दर्शक संजय लीला भन्साळीचा ‘पद्मावत’ चित्रपटाची घोषणा केली. घोषणेनंतर अभिनेता शाहरुख खान अलाउद्दीन खिलजीची भूमिका साकारणार असल्याच्या बातम्याही आल्या होत्या.
शाहरुख खानच्या बातम्या येत असताना रणवीर सिंहला चित्रपटात संधी मिळाल्याचे स्पष्ट झाले. परंतू रणवीरला संधी देऊनही एका क्षणी अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेसाठी अंतिम ठरलेल्या स्वतःच्या काही वैयक्तिक कारणांमुळे त्याने चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. रणवीरने नकार देताच संजय लीला भन्साळी यांनी त्याचा निर्णय शांतपणे मान्य केला. त्यानंतर या पात्रासाठी त्यांनी थेट शाहरुख खानचे घर गाठले.
परंतु चित्रपटाचे शीर्षक बदलणार असाल तरच मी भूमिका साकारेल अशी अट शाहरुखने टाकली. शाहरुखच्या अट नंतर चित्रपटात नवा ट्वीस्ट झाला होता. कारण शाहरुखची अट मान्य केल्यास अभिनेत्री दीपिका पादूकोणने चित्रपटातून बाहेर पडण्याचा इशारा दिला. या सगळ्या हेरागिरीमध्ये रणवीर पुन्हा चित्रपटाच्या शुटिंगसाठी परतला. त्यामुळे शाहरुखचा पत्ता कट झाला.