Congress Lok Sabha elections| आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. असे असतानाच लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. सनातनविरोधी घोषणा देऊ शकत नसल्याने आणि देशाची संपत्ती निर्माण करणाऱ्यांचा गैरवापर करू शकत नसल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. याबाबत त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहे.
गौरव वल्लभ यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठवलेल्या राजीनाम्याचे पत्र सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. यामध्ये त्यांनी लिहिले की, ‘आज काँग्रेस पक्ष ज्या दिशाहीन मार्गाने पुढे जात आहे, तो मला तरी योग्य वाटत नाही. मी सनातनविरोधी घोषणा देऊ शकत नाही किंवा सकाळ-संध्याकाळ देशाच्या वेल्थ क्रिएटर्सना शिवीगाळ करू शकत नाही. या कारणास्तव मी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.’
पुढे त्यांनी लिहिले की, ‘मी भावनिक आणि मनाने दु:खी आहे. मला खूप काही सांगायचे आणि , लिहायचे आहे. पण माझे संस्कार मला असे काहीही बोलण्यास मनाई करतात. तरीही आज मी माझे मत तुमच्यासमोर मांडत आहे, कारण मला वाटते की सत्य लपवणे हा देखील गुन्हा आहे. अशा स्थितीत मला गुन्ह्यात सहभागी व्हायचे नाही.’
कांग्रेस पार्टी आज जिस प्रकार से दिशाहीन होकर आगे बढ़ रही है,उसमें मैं ख़ुद को सहज महसूस नहीं कर पा रहा.मैं ना तो सनातन विरोधी नारे लगा सकता हूं और ना ही सुबह-शाम देश के वेल्थ क्रिएटर्स को गाली दे सकता.इसलिए मैं कांग्रेस पार्टी के सभी पदों व प्राथमिक सदस्यता से इस्तीफ़ा दे रहाहूं pic.twitter.com/Xp9nFO80I6
— Prof. Gourav Vallabh (@GouravVallabh) April 4, 2024
‘जेव्हा मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता, तेव्हा काँग्रेस हा देशातील सर्वात जुना पक्ष असल्याचा माझा विश्वास होता. येथे तरुण आणि बुद्धिजीवी लोकांच्या विचारांना महत्त्व दिले जाते, परंतु गेल्या काही वर्षांत माझ्या लक्षात आले आहे की, पक्षाचे सध्याचे स्वरूप नवीन विचारांसह तरुणांशी जुळवून घेऊ शकत नाही.’
गौरव वल्लभ यांनी पुढे लिहिले की, ‘अयोध्येतील भगवान श्रीरामाच्या मंदिराप्रकरणी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेने मी नाराज आहे. मी जन्माने हिंदू आहे आणि व्यवसायाने शिक्षक आहे. पक्षाच्या या भूमिकेने मला नेहमीच अस्वस्थ केले आहे. पक्ष आणि आघाडीशी संबंधित अनेकजण सनातनच्या विरोधात बोलतात आणि त्यावर पक्षाने मौन बाळगणे चुकीचे आहे.”
उदयपूरमधून गौरव वल्लभ यांचा पराभव
मागील 2023 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने राजस्थानच्या उदयपूर मतदारसंघातून गौरव वल्लभ यांना तिकीट दिले होते. मात्र, उदयपूरमधून गौरव वल्लभ यांचा भाजपच्या ताराचंद जैन यांच्याकडून पराभव झाला. जैन यांनी गौरव वल्लभ यांचा 32 हजार मतांनी पराभव केला होता.
बॉक्सर विजेंदर सिंग भाजपात
दरम्यान, बॉक्सर विजेंदर सिंग याने देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विजेंदर सिंगने 2019 मध्ये काँग्रेसकडून दक्षिण दिल्ली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्याचा पराभव झाला होता.
हेही वाचा:
माढ्यात शरद पवारांची मोठी खेळी ; धैर्यशील मोहिते पाटलांना देणार उमेदवार ?