Sanjay Singh । आम आदमी पक्षाच्या (आप) सर्वात हायप्रोफाइल नेत्यांपैकी एक संजय सिंह यांना अबकारी धोरण घोटाळ्या प्रकरणी नुकताच जामीन मिळाला आहे. संजय सिंह यांच्या तुरुंगाबाहेर पडल्याने लोकसभा निवडणुकीला आता रंग चढणार असल्याचे दिसत आहे. मास्टर स्ट्रॅटेजिस्ट आणि उत्तम वक्ता म्हणून संजय सिंह यांची ओळख आहे. त्यांची उपस्थिती आपच्या बाजूने निवडणुकीचे वातावरण बदलू शकते. संजय सिंह यांच्या सुटकेमुळे ‘आप’ला बळ का मिळेल हे5 मुद्द्यांच्या माध्यमातून जाणून घेऊयात…
1. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढेल Sanjay Singh ।
संजय सिंह यांच्या सुटकेचा पहिला मोठा संदेश तो म्हणजे कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे मनोबल वाढेल. अनुभवी नेते म्हणून संजय सिंह यांनी गेल्या काही वर्षांत ‘आप’च्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मुख्यतः ते त्यांच्या संघटनात्मक कौशल्यांसाठी देखील ओळखले जातात. पक्ष आणि त्याच्या स्वयंसेवकांमध्ये एकता, ऐक्य आणि प्रेरणा आणणारा नेता म्हणूनही त्यांची ओळख आहे, ज्यामुळे AAP च्या निवडणूक प्रचारात लक्षणीय वाढ होऊ शकते.
2. मास्टर स्ट्रॅटेजिस्ट आणि घोषणा तयार करण्याची कला
संजय सिंह हे त्यांच्या सर्जनशील मनासाठी देखील ओळखले जातात, ते अनेकदा शक्तिशाली घोषणा तयार करतात. एवढंच नाही तर प्रेरक गाणी तयार करण्यातही त्यांचा हातखंडा आहे. ही घोषणा आणि गाणी सर्वसामान्य मतदारांना थेट जोडतात अन् प्रभावित करतात. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जनतेचा मूड जाणून घेण्यातही ते माहीर आहेत. याचा फायदा AAP ला होऊ शकतो.
3. भगवंत मान यांना दिलासा, दिल्ली सांभाळणार
संजय सिंहच्या सुटकेचा पंजाब युनिटलाही फायदा होणार आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावरील दबाव कमी होण्याची शक्यता आहे. आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर भगवंत मान हे पक्षाच्या संघटनेपासून व्यवस्थापनापर्यंतच्या जबाबदाऱ्या सांभाळताना दिसत आहेत. मान हे पंजाबचे मुख्यमंत्री असल्याने त्यांना अनेकदा महत्त्वाच्या बैठकींसाठी पंजाबमध्ये वेळ घालवावा लागतो. दिल्लीदरम्यान प्रवासही करावा लागतो. तुरुंगातून सुटलेले संजय सिंह आता दिल्लीत गड राखून निवडणुकीत मोक्याची भूमिका बजावू शकतात.
4. एक चांगला वक्ता, लोकांशी संपर्क साधण्याची कला Sanjay Singh ।
त्यांच्या धोरणात्मक क्षमतेव्यतिरिक्त, संजय सिंह एक उत्तम वक्तादेखील आहेत. केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत ते त्यांच्या आक्रमक पण भावनिक भाषणांनी पाठिंबा मिळवून पक्षाचा प्रचार जोरदारपणे पुढे नेऊ शकतात. उत्तर प्रदेशातून आलेल्या संजय सिंह यांच्याकडे हिंदी पट्ट्यातील मतदारांशी संपर्क साधण्याची उत्तम कला आहे, जी आपसाठी फायदेशीर ठरू शकते.
5. इंडिया आघाडीसाठी मौल्यवान
इंडिया आघाडी आकाराला आलीय. संजय सिंग यांना जामीन मिळणे आणि त्यांचे राजकीय क्षेत्रात पुनरागमन केवळ ‘आप’साठीच नव्हे तर संपूर्ण इंडिया आघाडीसाठी फायदेशीर ठरेल. आपल्या राजकीय कौशल्याने ते विरोधकांना भाजपविरोधात रणनीती तयार करण्यात लक्षणीय मदत करू शकतात. एकूणच, संजय सिंह यांची तुरुंगातून सुटका खेळ बदलणारी असू शकते. त्यासोबत सध्याच्या लोकसभा निवडणुकीत राजकारणाची दिशा बदलू शकते.