मुंबई – राज्याच्या मंत्रालयात चक्क दारुच्या बाटल्यांचा खच पडल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे मंत्रालयात जाणाऱ्या प्रत्येकीची कसून तपासणी करण्यात येते. तरीसुद्धा आत दारूच्या बाटल्या गेल्या कशा हा सर्वांना प्रश्न पडला आहे. अथवा हे दारू पिणारे कोण असावे हा सुद्धा सर्वांनाच प्रश्न पडला आहे.
ज्या मंत्रालयातून राज्याचा कारभार चालतो त्याच मंत्रालयात दारुंच्या बाटल्यांचा खच आज बघायला मिळाला आहे. दारुच्या बाटल्यांचा हा खच दिसून आल्याने मंत्रालयात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मंत्रालयात कडक बंदोबस्त आहे. तसेच ठिकठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत असे असताना दारुच्या बाटल्या आल्या तरी कशा हा प्रश्न उपस्थीत झाला आहे.
दरम्यान या विषयी बातमी पसरल्यावर लगेचच स्वच्छता कर्मचाऱ्यांनी तिथे पोचून दारूचा खच उचलायला सुरुवात केली. याप्रकरणी चौकशी करण्यात केली जाणार असून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे.