मुंबई – अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचे लग्न होवून जवळपास दीड महिना उलटला आहे. गेल्या दीड महिन्यात सलमान खानने सोशल मीडियावर तिला शुभेच्छा दिल्या नव्हत्या. मात्र, आता दीड महिन्यानंतर सलमानला कतरिनाची आठवण आली आहे.
नुकतंच, हिंदी ‘बिग बॉस 15’चा दिमाखदार ग्रॅड फिनाले पार पडला. यावेळी अभिनेत्री रुबीना दिलैक आणि राखी सावंतने कतरिनाच्या अग्नीपथ मधील ‘चिकनी चमेली’ या गाण्यावर डान्स केला. कतरिनाचे हे गाणे त्यावेळी अतिशय हिट ठरले होते. राखी आणि रुबिनाचा डान्स परफॉर्मन्स संपल्यानंतर सलमानने कतरिनाचे नाव घेत ‘कतरिना.. लग्नाच्या खूप शुभेच्छा.!’ असं म्हंटल आहे.
दरम्यान, तब्बल दीड महिन्यानंतर सलमान खानने कतरिनाची आठवण काढल्यानंतर चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कतरीना आणि विकी कौशलच्या विवाह सोहळ्या दरम्यान सलमान कामत व्यस्त असल्यामुळे लग्नाला पोहोचू शकला नसल्याचे वृत्त त्यावेळी समोर आले होते.