पुलवामा हल्ल्यातील शहिदांना वाहिली श्रद्धांजली
संत रोहिदास तरुण मंडळाकडून गुलाल विरहित मिरवणूक
कार्ला – येथील संत रोहिदास तरुण मंडळ यांच्या दीड दिवसाच्या गणरायाची विसर्जन मिरवणूक गुलाल विरहित व कोल्हापूर-सांगली येथील पूरग्रस्त भागात मृत्युमुखी पडलेल्या व पुलवामा येथे हल्ल्यामध्ये शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून मिरवणुकीला काढण्यात आली.
मिरवणूक ही गुलाल विरहित व टाळ-मृदुगांचा गजर करीत “ज्ञानोबा-माऊली तुकाराम’, “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर’ जयघोष करीत गणेशभक्तांनी मंगलमय वातावरणात या वर्षी आलेल्या दीड दिवसाच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.