नरसिंहपूर – इंदापूर तालुक्यातील श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर येथील पूर परिस्थित गंभीर बनलेली आहे. पुरामुळे गावातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सध्या गावातील सुमारे 50 ते 60 कुटुंबांची राहण्याची सोय प्रशासनाने येथील भक्त निवास, नरसिंह मंदिर तर एका मंगल कार्यालयात करण्यात आली आहे.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1359064261099942/
दरम्यान, नागरिकांना श्री क्षेत्र नरसिंह मंदिरात जाण्यासाठी होडीचा वापर करावा लागत आहे. गावातील अनेक दुकाने पाण्याखाली गेले असून, याठिकाणी सुमारे 10 ते 15 फूट पाणी आहे. गावातील अनेक रस्तेही पूराच्या पाण्याखाली गेलेले आहेत. त्यामुळे गाव संपूर्ण पाने जलमय दिसत आहे.
बुधवारी रात्री उजनी धरणातून भिमा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. तर वीर धरणातून निरा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे श्री क्षेत्र नरसिंहपूर कडे जाणारे रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
दरम्यान, हा पूर पाहण्यासाठी गावातील नागरिक गर्दी करत आहे. तसेच स्थानिक अधिकारी आणि प्रशासन गावातील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.