नवी दिल्ली -हाथरस येथील दलित तरुणीवरील कथित बलात्कार आणि हत्या प्रकरणाने देशातील वातावरण तापले असतानाच या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. मात्र, या पीडितेच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे नेते राहुल आणि प्रियांका गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची अखेर भेट घेतलीच.
हाथरस के पीड़ित परिवार के प्रश्न:
1. सुप्रीम कोर्ट के जरिए पूरे मामले की न्यायिक जाँच हो
2. हाथरस DM को सस्पेंड किया जाए और किसी बड़े पद पर नहीं लगाया जाए
3. हमारी बेटी के शव को बगैर हमसे पूछे पेट्रोल से क्यों जलाया गया?
4. हमें बार-बार गुमराह किया, धमकाया क्यों जा रहा है? 1/2— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 3, 2020
तर आज प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून उत्तर प्रदेश सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. ‘संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयामार्फत चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे आणि त्यांना कोणत्याही मोठ्या पदाची जबाबदारी दिली जाऊ नये” असं प्रियंका यांनी म्हटलं आहे.
त्यांनी या ट्विटमध्ये मुलीचा मृत्यू आणि तिच्या अंत्यसंस्कारा -संबंधी काही प्रश्न विचारले आहेत. आमच्या मुलीचा मृतदेह आम्हाला न विचारता पेट्रोल टाकून का जाळण्यात आला?, आमची वारंवार दिशाभूल का केली जाते आहे? आम्हाला धमकावलं का जातंय? योगी आदित्यनाथ यांनी त्यांची जबाबदारी समजायला हवी होती, अशी प्रतिक्रिया प्रियांका गांधी यांनी व्यक्त केली.
दरम्यान, जर त्यांची मुलगी माझ्या मुलीच्या जागी असती तर अशा रात्रीच्या भयावह गडद काळोखात त्यांनी अंत्यसंस्कार केले असते का? असा संतप्त सवाल हाथरसमध्ये झालेल्या कथित बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी केला आहे. या युवतीच्या मृतदेहावर रात्रीच अंत्यसंस्कार उरकण्यासाठी पोलिसांनी बळजबरी केल्याचा आरोप पीडितेचे कुटुंबीय करत आहेत.