नवी दिल्ली – देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये गेल्या काही दिवसांपासून लक्षणीय वाढ होत असल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालं असतानाच आज आरोग्य मंत्रालयाने दिलासा देणारी माहिती दिली आहे. मंत्रालयातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, अमिरिकेला मागे सोडत भारत आता जगातील सर्वाधिक कोरोनामुक्त रुग्णांचा देश बनला आहे.
आजवर भारतामध्ये ४२ लाख लोकांनी कोरोनावर मात केली असून गेल्या २४ तासांमध्ये सर्वाधिक ९५ हजार ८८५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. परिणामी देशाचा कोरोना रिकव्हरी रेट आता ७९.२८ टक्क्यांवर पोहचला आहे. रिकव्हरी रेतीच्या बाबतीत भारत जगात अव्वल आहे.
दरम्यान, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच देशात जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. चालू महिन्यात दररोज ९० हजारांहून अधिक रुग्ण वाढत असून आतापर्यंत एकूण १६,८६,७६९ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.
आरोग्य मंत्रालयानं रुग्ण बरे होण्याचं श्रेय केंद्र सरकारला देत रणनीती, ठोस उपाययोजनांसाठी चाचण्या, सुरुवातीच्या टप्प्यात रुग्णांची ओळख, ट्रॅकिंग आणि देखरेखीसाठी उचललेली पावलं यामुळे हे शक्य झाल्याचं म्हटलं आहे.
India overtakes #USA and becomes No.1 in terms of global #COVID19 RECOVERIES.
TOTAL RECOVERIES cross 42 lakh.https://t.co/sJf1AS4zBg@PMOIndia @drharshvardhan @AshwiniKChoubey @PIB_India @DDNewslive @airnewsalerts @COVIDNewsByMIB @CovidIndiaSeva @ICMRDELHI
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) September 19, 2020