मुंबई – करोनामुळे यंदा विद्यार्थ्यांची मोठी समस्या झाली आहे. त्यात पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या अभूतपूर्व गोंधळामुळे विद्यार्थी अजूनही संभ्रमावस्थेत आहे. पदवीच्या परीक्षा होणार असून विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. प्रमाणपत्रावर कोविड-19 असा उल्लेख नसणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उदय सामंत म्हणाले, 50 मार्कांची परीक्षा होणार आहे. 90 टक्के विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार आहेत. तसेच मागील वर्षांचे मार्क्स गृहीत धरण्यात येणार आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्यांची डिसेंबरमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे.
याशिवाय पदवी प्रमाणपत्रात कोविड-19 चा उल्लेखाबाबत जो चुकीचा संदेश देईल त्यावर पोलीस कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.