मुंबई- राज्य सरकार व मुंबई महानगरपालिकेने वारंवार नियमात केलेले बदल, अंमलबजावणीतील शिथिलता, रुग्ण संख्या लपवण्यासाठी कमी केलेल्या चाचण्या आणि घरी बसून चालवलेला कारभार याचा हा परिणाम असून, कंगनाच्या मागे लागण्यापेक्षा कोरोनाच्या मागे राज्य सरकार लागले असते तर आज महाराष्ट्रावर ही दुरावस्था ओढवली नसती, अशी टीका भाजप नेते भातखळकर यांनी केली आहे.
ऑगस्ट महिन्यात कोरोना परिस्थिती आटोक्यात आली होती. मात्र मात्र, लॉकडाऊनमध्ये शिथिलता, गणेशोत्वसाठी दिलेली सूट, मास्क न बांधणे किंवा सुरक्षित अंतर न राखणे. यामुळे मुंबईत पुन्हा कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या सर्व मुद्दयांवरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात दर दिवशी सुमारे सात ते नऊ हजार चाचण्या होत होत्या आणि बाधितांचे प्रमाण सुमारे १० ते १२ टक्के होते. पुढील आठवडय़ात हे प्रमाण जवळपास १५ टक्क्यांपर्यंत पोहोचले. सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात चाचण्यांची संख्या आठ ते नऊ हजार झाली आणि बाधितांचे प्रमाण २२ टक्क्यांपर्यंत पोहोचले, असंही ते म्हणाले.