मुंबई – सिनेअभिनेत्री कंगना राणावत विरुद्ध शिवसेना असा वाद मुंंबईत काही दिवस प्रचंंड चर्चेत होता अजुनही त्यावर उत्तर असे समोर आलेले नाही. दोन दिवसांपूर्वीच कंगना मुंबईवरून पुन्हा आपल्या गावी मनालीला परतली आहे. मात्र, जाताजाता कंगनाने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. सोबतच आपल्यासोबत घडलेल्या अन्यायाबाबत मत मांडले आहे.
याच पार्शवभूमीवर कंगनाने कंगनाने सोशल मीडियावर काही ट्विट शेअर केले. दरम्यान, आपल्या वर होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर देताना तिच्याकडून मोठी घोडचूक झाली आहे. तिने दादासाहेब फाळके यांचा उल्लेख चक्क “बाबासाहेब फाळके” असा केला आहे. यामुळे ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे.
इंडस्ट्री सिर्फ़ करण जोहर/उसके पापा ने नहीं बनाई,बाबा साहेब फाल्के से लेकर हर कलाकार और मज़दूर ने बनाई है,उस फ़ौजी ने जिसने सीमाओं को बचाया,उस नेता ने जिसने संविधान की रक्षा की है,उस नागरिक ने जिसने टिकट ख़रीदा और दर्शक का किरदार निभाया,इंडस्ट्री करोड़ों भारतवासीयों ने बनाई है। https://t.co/klkJlqcJ6C
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 15, 2020
ट्विटरवर मनीष अग्रवाल यांनी कंगनावर केलेल्या आरोपांनंतर तिने यावर उत्तर दिले. ‘इंडस्ट्री फक्त करण जोहर आणि त्याच्या वडिलांनी निर्माण केली नाही. तर बाबासाहेब फाळकेंपासून ते प्रत्येक कलाकार आणि मजुराने उभी केली आहे.’ अश्या आशयाचे ट्विट कंगनाने केले. मात्र, या ट्विटमध्ये दादासाहेब फाळके यांचा उल्लेख बाबासाहेब केल्यामुळे ती सोशल मीडियावर ट्रोल झाली.
अरे नशेडी़ मैडम अभी तक नशा उतरा नहीं क्या..?
बाबा साहेब फाल्के नही –
वो दादा साहेब फाल्के अवार्ड है…
कितना नशा करती हो ..— Mumtaz इलाहाबादी (@MumtazAICC) September 15, 2020