नवी दिल्ली : लडाखच्या पॅनगॉंग टीसो आणि देप्सांग भागात चीनने तळ उभारल्याचे लक्षात आल्यानंतर भारतीय लष्करानेही तेथे तळ उभारला आहे. तेथील जवानांची संख्या वाढवण्यात आली आहे.
चीनच्या पॅनगॉंग खोऱ्यातील हालचाली या दिसू शकणाऱ्या आहेत. हा त्या क्षेत्रातील सीमा बदलण्याचा एकतर्फी प्रयत्न असल्याचे मानण्यात येत आहे. ही सुरवात डोकलाम संघर्षानंतर सुरू झाली होती.
दोन्ही देशातील कमांडर दर्जांच्या अधिकाऱ्यांत मोल्डो येथे झालेल्या चर्चेनंतर चीनी लष्कराची संख्या काहीशी कमी झाल्याचे दिसत आहे. मात्र तरीही अद्याप मोठ्या संख्येने तेथे चीनी सैन्य तैनात आहे. सैन्य माघारी नेण्याचा हा प्रकार मान्य नसल्याचे भारतीय लष्कराने स्पष्ट केला आहे.उपग्रहावरून मिळालेल्या छायाचित्रांच्या आधारे चीनने केवळ तंबू आणि तळच उभारले नसून फिलबॉक्स उभअरल्याचे दिसत आहे.
पिलबॉक्स हे शस्त्रांसाठी उभारलेले कायम स्वरूपी बंकर असतात. फिंगर चारच्या भागात संगर आणि संरक्षक भींती उभारल्याचे या छायाचित्रांवरून स्पष्ट होत आहे.प्रत्यक्ष ताबाबरेषेच्या पाठीमागेही चीनने लष्करी मदतीसाठी उभारलेल्या छावण्याही उपग्रहांने टिपलेल्या छायाचित्रांमध्ये दिसत आहेत.
पॅनगॉंग टीसो भागात चीनने कोणतीही आगळीक केल्यास चोख प्रत्यूत्तर देण्यासाठी मोठ्या प्रमाणात लष्कर तेथे तैनात करण्यात आले आहे. सीमेवर चीनने सैन्याची जमवा जमव आधी केली. त्यामुळेसीमेवरून सैन्य कमी करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे, अशी भारतीय लष्कराची ठाम भूमिका आह.