मुंबई: कोरोना महामारीच्या या भयानक संकटात राज्यातील पोलीस कर्मचारी अहोरात्र सेवा देत आहेत. आतापर्यंत ५१ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ६५ लाख रुपयांपर्यंत मदत करण्यात येत आहे, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
तसेच कोरोनाने जीव गमावलेल्या पोलिसांच्या निवृत्तीच्या अंतिम तारखेपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय अधिकृत निवासस्थानात राहता येईल, अशी माहितीही देशमुख यांनी दिली.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पोलीस मोठ्या हिमतीने या संकटाशी लढा देत आहे. काही पोलिसांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ही महत्वाची घोषणा केली आहे.