नवी दिल्ली – गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या झटापटीत २० भारतीय जवान शाहिद झाले. या घटनेनंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळली असली असून राजकीय वातावरणही देखील चांगलंच तापलं आहे. काँग्रेस नेते गलवान खोऱ्यातील घटनेवरून सत्ताधारी भाजपसमोर अनेक प्रश्न उपस्थित करताना दिसतायेत.
अशातच आज राहुल गांधी यांनी, “चीनने आमच्या निशस्त्र सैनिकांना मारण्याची हिंमत केलीचं कशी? व आमच्या सैनिकांना शहीद होण्यासाठीच निशस्त्र पाठवले गेले का?” असे प्रश्न उपस्थित केले होते. मात्र राहुल गांधी यांच्या या प्रश्नांवरून भाजप नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
राहुल गांधींच्या या प्रश्नांना उत्तर देताना भाजप नेतेसंबित पात्रा यांनी, “कॉंग्रेस सरकारच्या कार्यकाळात, चीनशी झालेल्या करारामध्ये असा निर्णय घेण्यात आला होता की प्रत्यक्ष ताबा रेषेच्या दोन किलो मीटर अंतरामध्ये बंदुका आणि तोफांचा वापर केला जाणार नाही. जर राहुल गांधी यांना हे देखील माहित नसेल तर ते देशाच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वाधिक बेजबाबदार राजकारणी आहेत.” असा टोला लगावला आहे.
तत्पूर्वी राहुल गांधी यांच्या या प्रश्नांवरून परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी देखील निशाणा साधत, “याबाबतची वस्तुस्थिती अशी की, सीमेवर तैनात असलेले सर्व जवान सदैव सशस्त्र असतात. विशेषतः आपली पोस्ट सोडण्यापूर्वी जवान स्वतः जवळ शस्त्र बाळगतातच. १५ जून रोजी देखील गलवान खोऱ्यात तैनात असलेल्या सैनिकांकडे आपली शस्त्र होती. मात्र १९९६ व २००५ च्या करारानुसार फेसऑफ दरम्यान दोन्ही बाजूंकडून शस्त्रांचा वापर केला जाणार नाही असा समझोता करण्यात आलाय.” असं प्रतिउत्तर दिलं होतं.
कांग्रेस सरकारों के समय में चीन से हुए समझौते में तय किया गया था कि एलएसी के 2 किलोमीटर रेंज में गन, बम इस्तेमाल नहीं किया जाएगा।
अगर ये जानकारी आपके पास नहीं है तो मुझे माफ कीजिएगा, राहुल गांधी, आप देश में अब तक के सबसे ज्यादा गैर-जिम्मेदार राजनेता हैं: डॉ @sambitswaraj
— BJP (@BJP4India) June 18, 2020