वाघोली -राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख राज्यातील पोलीस बांधव व करोनाग्रस्तांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचे मनोबल वाढवण्यासाठी राज्यभर भ्रमणध्वनीद्वारे, प्रत्यक्ष भेटी देऊन संपर्क साधत आहेत.
सर्व राज्यातील कर्मचारी वर्गांचा मनोबल वाढवण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतल्याने कर्मचारी व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुणे शहरात गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून त्यांच्या या कार्याबद्दल वाघोली ग्रामस्थांच्यावतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते चिराग राजेंद्र सातव पाटील यांनी त्यांचा सन्मान केला.
तसेच यापुढील काळात देखील हा उपक्रम सुरू ठेवण्याबाबत सातव यांनी गृहमंत्री देशमुख यांना विनंती केली.