नयी दिल्ली – लॉक डाऊन वाढवित जाणे केवळ अर्थव्यवस्थेसाठी घातक नाही तर त्यामुळे आरोग्याचे इतर प्रश्न निर्माण होतात असे जेष्ट उद्योजक आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे.
सध्याच्या परिस्तितीत या विषयावर निर्णय घेणे सराकरला सोपे नाही याची आपल्याला जाणीव आहे. मात्र तरीही लॉक डाऊन वाढविल्यामुळे मदत होणार नाही. प्रदिर्घ लॉक डाऊनुळे मानसीक आरोग्याचे इतर मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर करोनाशीवाय इतर रोगाच्या उपचाराकडे इतका काळ दूर्लक्ष कल्यास ते महागात पडू शकते अशा प्रकारचा एक अहवाल जारी झाला आहे. त्याकडे यावेळी महिंद्री यांन लक्ष वेधले.
49 दिवसांच्या लॉक डाऊननंतर लॉक डाऊन वाढऊ नये असे या अगोदर त्यानी सुचविले होते. त्याचबरोबर हळूहळू लॉक डाऊन कमी करण्याऐवची ते पुर्ण पणेकमी करण्याची गरज असल्याचे सांगितले होते. आगामी काळातही करोनाचेरुग्न वाढत राहणार आहेत. त्यासाठी उपचाराच्या सुविधा विस्तारीक करण्याची गरज आहे. सरकारने अनेकदा लॉक डाऊनचा कालवधी वाढविला आहे.त्यामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.