नवी दिल्ली : गेल्या 2 महिन्यांपासून जागेवरच थांबलेली रेल्वे दि. 1 जूनपासून धावण्यास सज्ज झाली आहे. याबद्दल केंद्र सरकारने बुधवारी रात्री उशिरा घोषणा केली. लॉकडाऊन सुरू असल्याने पहिल्या टप्प्यात देशात 200 धावणार आहेत. पण, यासाठी लागणारे तिकीट फक्त ऑनलाइन मिळणार आहे. कोणत्याही रेल्वे स्टेशन किंवा खासगी एजंटकडे तिकीट विक्री केली जाणार नाही, असं सरकारने स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, दि. 1 जूनपासून रेल्वे सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी कालच दिली होती. त्यानुसार रात्री ही घोषणा करण्यात आली आहे. यानुसार या धावणाऱ्या सर्व गाड्या नॉन एसी असतील. त्यांचे वेळापत्रक पूर्वीप्रमाणे असेल. शिवाय या गाड्यांचे थांबेदेखील पूर्वीच्या नियोजनानुसारच असतील. या गाड्यांचे रिझर्व्हेशन आज सकाळी 10 वाजेपासून IRCTC च्या वेबसाईट किंवा मोबाईल अँपवर करता येणार आहेत.
प्रवासात कोणालाही बेडशीट, ब्लॅंकेट मिळणार नाही, असे या आदेशात नमूद केले आहे.
त्यामुळे तब्बल 2 महिन्यांनी देशातील रेल्वे दळणवळण पुन्हा सुरू होणार असल्याने अनेकांना आता त्यांच्या कामानिमित्त प्रवास करता येणार आहे.