नवी दिल्ली – हिटमॅन रोहित शर्मा आज जे यश मिळवत आहे त्याचे संपूर्ण श्रेय माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला द्यायला हवे, अशा शब्दात माजी कसोटीपटू गौतम गंभीरने आपले मत मांडले आहे. 2011 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेत माझे शतक धोनीमुळे हुकले अशी टीका गंभीरने केली होती आणि आज त्याने धोनीचे गुणगानही केले आहे.
रोहित जेव्हा अपयशी ठरत होता त्यावेळी त्याचे संघातील स्थानही धोक्यात आले होते. मात्र, त्याचवेळी धोनी त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला व त्यानेच प्रोत्साहन दिल्याने रोहितचा आत्मविश्वास वाढला त्यामुळेच आज तो जागतिक क्रिकेटवर वर्चस्व राखताना दिसतो, असेही गंभीरने सांगितले.