पुणे – रिझर्व्ह बॅंकेने सीकेपी सहकारी बॅंकेचा परवाना शनिवारी रद्द केला आहे. त्यामुळे या बॅंकेतील 1 लाख 32 हजार 170 ठेवीदारांत अस्वस्थता पसरली आहे. मात्र, या बॅंकेतील 99 टक्के ठेवीदारांना त्यांची रक्कम परत मिळेल, असे रिझर्व्ह बॅंकेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे की, नव्या नियमानुसार डिपॉझिट इन्शुरन्स ऍन्ड क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशनकडे ठेवीदारांच्या 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींचा विमा उतरविलेला असतो. या बॅंकेतील 99.2 टक्के ठेवीदारांचे पैसे यामुळे परत मिळणार आहेत, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. त्या बॅंकेचे कामकाज 2014 पासून कमी झाले होते आणि ही बॅंक पुनरुज्जीवित होण्याची शक्यता कमी असल्यामुळे या बॅंकेचा परवाना रद्द केला आहे. या बॅंकेत ग्राहकांच्या 485 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत तर, बॅंकेने 161 कोटी रुपयांचा कर्जपुरवठा केला आहे. पीएमसी बॅंकेसारखी मोठी बॅंका अडचणीत आल्यानंतर ठेवीदारांच्या रकमेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.
बॅंकेने पुढाकार घेऊन
1 लाख रुपयांऐवजी 5 लाख रुपयांचा विमा उतरविला असल्यामुळे बहुतांश बॅंकांतील ग्राहकांच्या 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित झाल्या आहेत.