नवी दिल्ली : देशातील ४५ शहरात झालेल्या कोरोना संक्रमणाबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाने चिंता व्यक्त केली आहे. या ४५ शहरातील ५५ लाख जणांची घरोघरी जाऊन स्कैनिंग करण्यात येणार आहे. मुंबई, नवीं मुंबई, पुणे, नागपुर, अहमदाबाद, सूरत, इंदौर जयपुर, हैदराबाद, चेन्नई, सिलीगुडी, सिवान, सेंट्रल दिल्ली, वेस्ट दिल्ली, नोएडा, आगरा आदी शहरांचा यात समावेश आहे. या शहरात लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाने चर्चा केली. त्याशिवाय मुंबई व दिल्लीच्या धर्तीवर या शहरांमधील डॉक्टरांना रुग्णालयाजवळील हॉटेलमध्ये येणार आहे. तसेच साप्ताहिक ड्युटी चार्ट बनवून सेल्फ क्वारंटाईन योजनेंतर्गत काम करण्यास सांगितले आहे.
कोरोनाशी झालेल्या लढाईत देशाला आतापर्यंत किती यश मिळाले, आणि पुढे काय तयारी करायची आहे, याचा आढावा घेण्यासाठी मंत्री गटाची शनिवारी दिल्लीत बैठक पार पडली. यात मंत्रिगटाने सांगितले कि, आतापर्यंत कोरोनामधील मृत्यूचे प्रमाण आता जवळजवळ ३.१ टक्के आहे तर, बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण २०.६६ टक्के आहे. इतर देशाच्या तुलनेत भारताची स्थिती समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले. देशात शनिवारपर्यंत ५ हजार ६२ जण कोरोनमुक्त झाले आहेत. तर मागील २४ तासात १ हजार ४२९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २४ हजार ५०६ वर पोहचला आहे. मंत्रिगटाने दिलेल्या माहितीनुसार देशात १ लाखांपेक्षा अधिक पीपीई आणि एन -95 मास्कचे निर्माण केले जात आहे. तर देशांतर्गत 104 उत्पादकांकडून व्हेंटिलेटरचे उत्पादन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
देशातील ९ उत्पादकांना ५९ हजारांपेक्षा जास्त व्हेंटिलेटरचे उत्पादन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मंत्र्यांच्या गटाने हॉटस्पॉट्स आणि क्लस्टर व्यवस्थापनाच्या धोरणासह देशभरात चाचणी धोरण आणि चाचणी किटच्या उपलब्धतेचा आढावा घेतला.