वेलिंग्टन : न्यूझीलंडविरूध्द झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावली. न्यूझीलंडने भारतावर १० विकेटनी विजय मिळवला. भारचाताचा झालेला हा पराभव कर्णधार विराट कोहलीने मान्य केला आहे.
पहिल्या कसोटीत प्रत्येक विभागात न्यूझीलंडने दमदार कामगिरी केली. आम्हाला कल्पना आहे की आम्ही चांगला खेळ केला नाही, पण जर लोकांना एका पराभवामुळे आम्हाला वाईट ठरवायचे असेल आणि राईचा पर्वत करायचा असेल तर त्याला आम्ही काही करू शकत नाही.
आमच्यासाठी ही एक क्रिकेट मॅच होती. ज्यात भारताचा पराभव झाला. आता आम्हाला या पुढे जायचे आहे आणि चांगली कामगिरी करायची आहे. विदेशात विजय मिळवायचा असेल तर चांगला खेळ करावा लागतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर या गोष्टी सोप्या नसतात. कारण, संघ येतात आणि तुमचा पराभव करतात, असे विराट म्हणाला.