मुंबई : गाव ते जिल्हा अशा 60 कि.मी.च्या अंतरात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. एसटीच्या एकूण प्रवाशांपैकी 90 टक्के प्रवासी या अंतरात प्रवास करतात. ही सेवा वाढविण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये परिवहन विभागाने 2 हजार साध्या लालपरी बसेस खरेदी करण्यासाठी 600 कोटी रूपयांचा प्रस्ताव वित्त विभागाला सादर केला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री ड.अनिल परब यांनी दिली.
एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजूर करुन वित्त विभागाला पाठविण्यात आला आहे. गेल्या वर्षी शासनाने 700 साध्या बसेस (500 लालपरी, 200 विठाई) खरेदी करण्यासाठी महामंडळाला निधी देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार महामंडळाने रु. 186 कोटीची मागणी शासनाकडे केली होती. त्यापैकी शासनाने रु. 110 कोटी एसटी महामंडळास दिले आहेत. या 700 बसेस नुकत्याच दाखल झाल्या आहेत.