श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये तीन सफाई कामगारांना पुलवामा जिल्ह्यातल्या चकमक प्रकरणी अटक झाली आहे. जैश-ए-मोहम्मदचे तीन अतिरेकी चकमकीत मारले गेल्याच्या घटनेचा तपास केंद्राने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला आहे. जम्मू-श्रीनगर मार्गावर गेल्याच महिन्यात ही घटना घडली होती.
हे अतिरेकी सांबा या भागात आंतरराष्ट्रीय सीमारेषा ओलांडून जम्मू-काश्मीरमध्ये कसे आले, याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवल्याची अधिसूचना काल केंद्रीय गृहमंत्रालयाने काढली. जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमारेषा ओलांडून जे तीन दहशतवाद्यांनी घुसले होते त्याविषयी सखोल चौकशी करण्याचे निर्देश “एनआयए’ला देण्यात आले आहेत.
रविवारी रात्री उशिरा झालेल्या कारवाईत दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातून तीन भूमिगत सदस्यांना 31 जानेवारीच्या चकमकीच्या संदर्भात अटक करण्यात आली आहे. सुहेल जावेद लोन, झहूर अहमद खान आणि शोएब मंजूर अशी या तिघांची नावे आहेत.