नवी दिल्ली : मी शांततेने निदर्शने करा. आसामकडे जाणारे रस्ते रोखा, असे आवाहन केले होते. मात्र त्या व्हिडिओ क्लिपमध्ये एडीटींग करून मी आसामला देशापासून तोडा, असे म्हटल्याचे दाखवण्यात येत आहे, मात्र माझ्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले असले तरी न्यायलयात ते काहीच सिध्द करू शकणार नाहीत, असे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी शरजील इमाम याने स्पष्ट केले आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पीएचडी करणारा शरजील हा दिल्लीतील शाहीनबाग निदर्शनाचे नेतृत्व करत आहे. त्याच्यावर अलीगढ मुस्लीम विद्यापीठात केलेल्या भाषणाबद्दल विविध पोलिस ठाण्यात पोलिसांनी देशद्रोहाचे गुन्हे नोंदवले आहेत. याबाबत इंडियन एक्सप्रेसने त्याच्याशी संपर्क साधला.
त्यावेळी शेरजील म्हणाला, मी शांततापूर्ण निदर्शने करण्याचे आवाहन केले. आसाममधील आंदोलनासंदर्भात मी म्हणालो होतो, आसामला जाणरे रस्ते रोखा. ते आवाहन मुळात चक्का जाम आंदोलनासारखे होते. त्यात फेरफार करून माझ्यावर देशद्रोहाचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. मात्र ते काहीही सिध्द करू शकणार नाहीत.
आसामच्या सिलीगुडी परिसराला चिकन नेक म्हटले जाते. हा भाग मुस्लीम बहुल आहे. हे चिकन नेक देशापासून तोडा असे वक्तव्य या क्लिपमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे.