नवी दिल्ली – दिल्ली भाजपचे अध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी यांनी पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहून ‘बालदिना’ची तारीख बदलण्याची विनंती केली आहे.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना आदरांजली म्हणून 14 नोव्हेंबर म्हणजेच त्यांचा जन्मदिन हा ‘बालदिन’ म्हणून हिंदुस्थानात साजरा करण्यात येतो. 1956 पासून ही परापंरा सुरू आहे.
मात्र हा बालदिन 14 नोव्हेंबरऐवजी 26 डिसेंबरला साजरा करण्यात यावा अशी मागणी तिवारी यांनी मोदींना केली आहे. तिवारी यांच्या नुसार, 26 डिसेंबररोजी बालदिन साजरा करून शिखांचे 10 वे धर्मगुरू गुरुगोविंद सिंग यांच्या दोन मुलांना श्रद्धांजली देता येईल, या दोघांच्या बलिदान दिनी ‘बालदिवस’ साजरा करण्यात यावा, अशी विनंती तिवारी यांनी पत्राद्वारे केली आहे.