मुंबई : प्रदीप पूजरच्या सहा बळीच्या जोरावर रणजी करंडक स्पर्धेतील सामन्यात रेल्वेच्या संघाने मुंबईचा पहिला डाव ११४ गुंडाळला. त्यानंतर रेल्वेने पहिल्या दिवसअखेर पहिल्या डावात ५ बाद ११६ धावा केल्या असून २ धावांची आघाडी घेतली आहे.
Stumps Day 1: Railways – 116/5 in 36.6 overs (Arindam Ghosh 52 off 74, Karn Sharma 24 off 46) #MUMvRLW @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 25, 2019
रेल्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना मुंबईला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होतं, पण रेल्वेच्या गोलंदाजानी मुंबईचा पहिला डाव ११४ वर संपुष्टात आणला.
Lunch break: Mumbai – 114/10 in 28.3 overs (Deepak B Shetty 8 off 10, Tushar U Deshpande 5 off 9) #MUMvRLW @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 25, 2019
पृथ्वी शाॅ व अंजिक्य रहाणे अपेक्षित कामगिरी करू शकले नाही. शाॅ १२ तर रहाणे अवघ्या ५ धावांवर बाद झाला. मुबंईकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ३९ धावा केल्या, त्याच्याशिवाय एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. रेल्वेकडून प्रदीप पूजरने सर्वाधिक ६, अमित मिश्राने ३ तर हिंमाशू सागवानने १ गडी बाद केला.
Pradeep Poojar 6 WICKETS! (10.3-1-37-6), Mumbai 114/10 #MUMvRLW @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 25, 2019
प्रत्युत्तरात रेल्वेच्या पहिल्या डावाची सुरूवात खराब झाली. अवघ्या ४३ धावांत त्याचा निम्मा संघ माघारी परतला. पण त्यानंतर अरंदिम घोष आणि करन शर्मा यांनी डाव सावरत ७३ धावांची भागिदारी करत रेल्वेची धावसंख्या दिवसअखेर ११६ पर्यत नेली. मुंबईकडून दीपक शेट्टीने ३ तर तूषार देशपांडे आणि आकाशने प्रत्येकी १ गडी बाद केला. पहिल्या दिवस खेळ थांबला तेव्हा करन शर्मा २४ आणि अरंदिम घोष ५२ धावांवर खेळत होता.